शिक्षणाच्या अधिकाराचा ठराव

ह्या ठरावामध्ये काय आहे?
  • ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत व सक्तीचे शिक्षण मिळण्याचा अधिकार आहे. ८६व्या घटना दुरुस्तीनुसार कलम २१ (अ) मध्ये हे विधान करण्यात आले आहे. शिक्षणाच्या अधिकाराचा ठराव याच दुरुस्तीला मूर्त रूप देण्यासाठी मांडण्यात आलेला आहे.
  • सर्व मुलांना सरकारी शाळांमधून मोफत शिक्षण दिले जाईल आणि या शाळांचे व्यवस्थापन ’शाळा व्यवस्थापन समिती’मार्फत केले जाईल. खाजगी शाळांनादेखील त्यांचेकडील किमान २५% मुलांना मोफत शिक्षण देणे बंधनकारक असेल.
  • प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता व इतर संबंधित बाबी हाताळण्यासाठी प्राथमिक शिक्षण राष्ट्रीय आयोग स्थापन केला जाईल.

पूर्ण ठराव खालील ठिकाणी   वाचता येईल

ठरावाचा इतिहास

डिसेंबर २००२:
६ ते १४ वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत व सक्तीचे शिक्षण मिळण्याचा अधिकार असावा ह्यासाठी. ८६व्या घटना दुरुस्तीनुसार कलम २१ (अ) (भाग III ) मध्ये दुरुस्ती.

ऑक्टोबर २००३:
कायद्याचा पहिला मसुदा तयार केला गेला व लोकांच्या प्रतिक्रिया आणि सूचना मिळण्यासाठी या वेबसाईटवर समाविष्ट केला गेला.

२००४:
आलेल्या प्रतिक्रिया व सूचना ध्यानात घेऊन मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा ठराव, २००४ या नावाने ठरावाचा सुधारित मसुदा तयार केला गेला व तो http://education.nic.in  या वेबसाईटवर समाविष्ट केला गेला.

जून, २००५:
केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाने ’शिक्षणाचा हक्क’ ह्या ठरावाचा मसुदा तयार केला व मानव संसाधन मंत्रालयाला सादर केला. मानव संसाधन मंत्रालयाने हा मसुदा श्रीमती सोनिया गांधी अध्यक्ष असणार्‍या NAC कडे पाठविला. NAC ने तो ठराव अभिप्रायासाठी पंतप्रधानांकडे पाठविला.

१४ जुलै, २००६:
वित्तसमिती आणि नियोजन आयोग यांनी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत हा ठराव नामंजुर केला आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी नमुना ठराव राज्यांकडे पाठविला. (८६व्या घटनादुरुस्तीनंतरच राज्यांनी त्यांच्याकडे निधीचा अभाव असल्याचे स्पष्ट केले होते.)

१९ जुलै, २००६:
CACL, SAFE, NAFRE, CABE यांनी ILP आणि इतर संस्थांना संसदीय कार्यवाहीचा परिणाम जाणून घेण्यासाठी तसेच जिल्हा व ग्रामीण स्तरावर कोणती पावले उचलता येतील याचा कृती आराखडा तयार करण्यासाठी सभेचे आयोजन केले.


नेहमी विचारले जाणारे प्रश्न:

भारताने शिक्षणाच्या अधिकाराचा ठराव संमत केला

भारतीय संविधानात संबंधित दुरुस्ती करून सहा वर्षे झाल्यावर केंद्रीय मंत्रिमंडळाने शिक्षणाच्या अधिकाराचा ठराव संमत केला. आता तो लवकरच संसदेत मंजुरीसाठी मांडला जाईल व तो मंजूर झाल्यावर प्रत्येक मुलाला मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत अधिकार प्राप्त होईल.

स्वातंत्र्यानंतर तब्बल सहा दशकांनंतर भारतीय सरकारने शिक्षणाच्या अधिकाराचा ठराव संमत केला आहे ज्यामुळे ६ ते १४ वर्षे वयोगटामधील प्रत्येक मुलाला मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने शिक्षणाच्या अधिकाराचा अनेक वर्षे प्रलंबित राहिलेला ठराव संमत केला आहे जो प्रत्येक मुलाला मोफत व सक्तीच्या शिक्षणाची खात्री देतो. या निर्णयामुळे भारतातील शिक्षणक्षेत्राला अत्यंत आवश्यक अशी गती मिळेल अशी आशा आहे.

ठरावातील काही ठळक बाबी अशा: दुर्लक्षित विद्यार्थ्यांसाठी खाजगी शाळांतील प्रवेशांमध्ये २५% आरक्षण. शाळांचा खर्च सरकार देणार तसेच प्रवेशावेळी देणगी किंवा कोणतीही कॅपिटेशन फी घेतली जाणार नाही शिवाय चाळणी प्रक्रियेचा भाग म्हणुन मुलाची किंवा त्याच्या पालकांची मुलाखतही घेतली जाणार नाही.

या ठरावानुसार मुलांना शारिरीक शिक्षा, शाळेतून काढून टाकणे आदी शिक्षा देणे तसेच शिक्षकांना जनगणना, निवडणुका, आपत्ती मदतकार्य यांव्यतिरिक्त इतर कामांवर लावणे आदी बाबींवरही बंदी येणार आहे. मान्यता मिळालेली नसतानाही शाळा चालविणे हा दंडात्मक गुन्हा होईल.

अर्थमंत्री पी. चिदम्बरम्‍ यांनी या ठरावाविषयी बोलताना सांगितले की हा हक्क मुलांना मिळवून देणे ही केंद्र व राज्य सरकार यांची कायदेशीर जबाबदारी राहील.

काही राज्यांत होणार्‍या आगामी निवडणुका लक्षात घेऊन मानव संसाधन मंत्रालयाने निवडणुक आयोगाशी सल्लामसलत करून या ठरावाचा पूर्ण तपशील प्रकाशित करावा असेही ते म्हणाले.

या ठरावाचे विश्लेषण करण्याचे काम दिलेल्या मंत्र्यांच्या गटाने ठरावात कोणताही बदल न करता तो संमत केला. यामध्ये दुर्लक्षित विद्यार्थ्यांसाठी खाजगी शाळांतील प्रवेशांमध्ये २५% आरक्षण ठेवण्याच्या मुद्द्याचाही समावेश आहे. राज्य शासनाला आपली घटनात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी ह्या मार्गाने खाजगी क्षेत्र हातभार लावू शकेल असे काहींना वाटते.

महात्मा गांधींनीही १९३७ सालीच अशा वैश्विक शिक्षणाची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. मात्र त्यावेळीदेखील ह्यासाठीच्या खर्चाची तरतूद करणे कठीण असल्याचे सांगण्यात आले तसेच संविधानातही याविषयी संदिग्ध प्रतिपादन करण्यात आले होते. १४ वर्षांपर्यंत वयाच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याचा शासनाने प्रयत्न करावा असे त्यावेळी सांगितले गेले होते. आजही प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश मिळविणे ही फारच कठीण बाब आहे.

अखेरीस २००२ साली ८६व्या घटनादुरुस्तीद्वारे शिक्षणाला मूलभूत अधिकाराचा दर्जा दिला गेला.

२००४ साली तत्कालीन NDA सरकारने या ठरावाचा मसुदा तयार केला होता मात्र तो सादर करण्यापूर्वीच त्यांना निवडणुकांमध्ये सत्ता गमवावी लागली. सध्याचा UPA सरकारने मांडलेला ठराव केंद्र व राज्य सरकार यांच्यामध्ये निधीच्या मुद्द्यावरून फिरत राहिला.

या ठरावाच्या टीकाकारांचे मत जरा वेगळे आहे. त्यांच्यामते, ६ वर्षांखालील व १४ वर्षांवरील मुलांचादेखील समावेश यामध्ये झाला पाहिजे. शिवाय सरकारने असलेल्या शाळांमधील शिक्षकांच्या कमतरतेवर, त्यांच्या गुणवत्तेच्या खालावलेल्या दर्जावर, साधनांच्या कमतरतेवर काहीही भाष्य केलेले नाही.

ह्यामधील राज्याच्या सहभागाविषयीच्या मुद्द्यावरून या ठरावाला कायदा व अर्थ मंत्रालयाकडून काहीसा विरोध झाला होता. कायदेमंत्रालयाला २५% आरक्षणाच्या मुद्यांवरून वादंग होईल असे वाटते तर मानव संसाधन विकास मंत्रालयाने यासाठी प्रतिवर्षी ५५ हजार कोटी रुपयांचा खर्च येईल असे वर्तवले आहे.

नियोजन आयोगाने यासाठी लागणारा पैसा देण्यास असमर्थता दर्शविली होती तर राज्य सरकारे खर्चाचा थोडासाच भाग उचलण्यासदेखील नाखूष होती. त्यामुळे सगळा खर्च केंद्र सरकारलाच करावा लागेल असे दिसत होते.

ठरावाच्या मसुद्यात प्रत्येक मोक्याच्या ठिकाणी येत्या तीन वर्षांत शाळा सुरू करणे हे मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ह्याठिकाणी शाळा हा शब्द विविध अर्थ दर्शवणार्‍या अनेक बाबींसाठी वापरण्यात आला आहे.

चालत्या कामात नेहमीच अडथळे आणणारे कागदी घोडे लक्षात घेऊन यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे आखण्यात आली आहेत. कारण दुर्गम ग्रामीण भागात तसेच गरीब शहरी विभागांत हा नेहमीचाच अनुभव आहे. पैशाच्या समस्येमुळे मूल शाळेत जाण्यापासून वंचित राहात असल्यास राज्य शासनाने ती समस्या सोडवावी असे बंधन आहे.

“कायदा आणि ठराव केल्यामुळे मुले शाळेत जातील असे मुळीच नसते. मुलांना शिक्षणाचा हक्क आहे की नाही हे महत्त्वाचे नाही तर आपण आपली सामाजिक जबाबदारी पार पाडून किती मुलांना शिक्षण देऊ शकतो आणि खर्‍या गरजू मुलांना ह्या योजनेचा लाभ मिळेणार का हा खरा कळीचा मुद्दा आहे. मुलांच्या फीचा खर्च जरी सरकार उचलणार असले तरी फीचा हा भार इतरांच्या माथी मारणे योग्य नाही”, असे लता वैद्यनाथन ह्यांचे मत आहे. ह्या बाराखंबा रोड, नवी दिल्ली  येथील मॉर्डन स्कूलच्या मुख्याध्यापक आहेत.

मात्र सामाजिक जबाबदारीच्या वाटपाकडे ओझे म्हणुन नाही तर संधी म्हणुन बघण्याची गरज असल्याचे मत ह्या ठरावाच्या बाजूने बोलणारे शिक्षणतज्ञ व्यक्त करतात.

हा कायदा का महत्त्वपूर्ण आहे आणि भारतामध्ये त्याचा काय अर्थ आहे?

मुलांकरिता मोफत आणि सक्तीचे शिक्षण कायदा 2009 संमत करणे हा भारतातील मुलांसाठी एक ऐतिहासिक क्षण आहे.
प्रत्येक मुलास अथवा मुलीस (त्यांच्या अधिकारानुसार) गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षण प्राप्त करण्याचा हक्क आहे आणि राज्याने कुटुंबे व लोकसमुदायांच्या मदतीने हे दायित्व पूर्ण करावे यासाठी हा कायदा आधारभूत घटक म्हणुन कार्य करतो.
जगातील काही देशात बालक-केंद्रीकृत, मैत्रीपूर्ण आणि मोफत शिक्षण प्रदान करण्याची राष्ट्रीय तरतूद आहे.

‘मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण’ म्हणजे काय?

६ ते १४ वर्षे वयाच्या सर्व मुलामुलींना त्यांच्या नजीकच्या शाळेमध्ये मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळविण्याचा हक्क असला पाहिजे.
प्राथमिक शिक्षण मिळवण्यासाठी मुलाला किंवा त्याच्या पालकांना कोणताही प्रत्यक्ष (शाळेची फी) किंवा अप्रत्यक्ष (गणवेष, पाठ्यपुस्तके, दुपारचा डबा, येण्या-जाण्याचा खर्च) खर्च करावा लागणार नाही. मुलाचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत सरकार शाळेचा सर्व खर्च प्रदान करेल.

शिक्षणाचा हक्क सुनिश्चित करण्यासाठी जाती समूह आणि पालकांसाठी कोणत्या भूमिकेचा विचार केला गेला आहे?

मुलांना मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षणाचा हक्क (आरटीई) कायदा २००९ मंजूर करणे भारतातील मुलांसाठी एक ऐतिहासिक प्रसंग आहे. भारतीय इतिहासात प्रथमच सरकारद्वारे कुटुंबे आणि लोकसमुदाय याच्या मदतीने मुलांना त्यांच्या गुणवत्तापूर्ण प्रथमिक शिक्षणाच्या हक्काची हमी दिली जात आहे.
जगातील काही देशात मुलांना त्यांच्या पूर्ण क्षमतेने विकसित होण्यासाठी मदत करण्याकरिता मुलांसाठी केंद्रीकृत, उपयुक्त शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय तरतूद आहे. वर्ष २००९ मध्ये भारतातील सुमारे ८० लाख सहा ते चौदा वर्षांदरम्यानची मुले शाळेत गेली नाहीत. जग भारताशिवाय सन २०१५ पर्यंत प्रत्येक मुलास संपूर्ण प्राथमिक शिक्षणाचे लक्ष्य गाठू शकणार नाही.
शाळांनी स्थानिक प्राधिकृत अधिकारी, पालक, संरक्षक आणि शिक्षकांची एक शाळा व्यवस्थापन समिती (एसएमसी) स्थापन केली पाहिजे. या एसएमसींनी शाळा विकास योजनेचा आराखडा तयार केला पाहिजे आणि सरकारी अनुदानाचा वापर व शाळेतील वातावरणाचे निरीक्षण केले पाहिजे. आरटीई ने सुविधाविरहित गटांमधील ५० टक्के महिला आणि मुलांच्या पालकांना एसएमसीमध्ये समाविष्ट करणे सक्तीचे केले आहे. अशा समुदायातील सहभाग मुले व मुलींकरिता स्वतंत्र स्वच्छतागृह सुविधा व आरोग्य, पाणी, स्वच्छता आणि आरोग्यशास्त्रीय समस्यांकडे पुरेसे लक्ष देऊन मुलांकरिता उपयुक्त संपूर्ण शाळा वातावरणाकरिता निर्णायक होऊ शकतो.

आरटीई मुलांसाठी उपयुक्त शाळांना कसे प्रोत्साहन देईल?

सर्व शाळांनी प्रभावी शैक्षणिक वातावरणासाठी मूलभूत संरचना आणि शिक्षकविषयक मापदंडांचे पालन केले पाहिजे. प्राथमिक स्तरावर दर साठ मुलांकरिता दोन प्रशिक्षित शिक्षक प्रदान केले जातील.
शिक्षकांनी शा्ळेत नियमित व वेळेवर उपस्थित राहणे, अभ्यासक्रम पूर्ण करणे, अध्ययन क्षमतांचे मूल्यांकन करणे आणि नियमित पालक-शिक्षक सभा घेणे आवश्यक आहे. शिक्षकांची संख्या इयत्तांच्या संख्येऐवजी विद्यार्थ्यांच्या संख्येवर आधारित असेल.
राज्याने मुलांच्या शिक्षणास सुधारित निकालांकडे नेण्यासाठी शिक्षकांना योग्य समर्थन दिले पाहिजे. निःपक्षपातीपणे शाळेची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी एसएमसी तयार करण्यामध्ये समुदाय व नागरी समाजाची महत्त्वपूर्ण भूमिका असेल. राज्य धोरणाचा आराखडा आणि प्रत्येक मुलासाठी आरटीई एक वास्तविकता बनली असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी सक्षम वातावरण प्रदान करेल.

भारतामध्ये आरटीईचे आर्थिक सहाय्य कसे दिले जाईल व हक्काची अंमलबजावणी कशी होईल?

हा कायदा प्रत्येक मुलास वा मुलीस गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षण मिळविण्याचा हक्क मिळेल याची खात्री करण्यासाठी आणि राज्याने हे कर्तव्य परिवार आणि समुदायांच्या मदतीने पार पाडावे यासाठी कार्यरत आहे.
जगातील काही देशांमध्ये अशी विनामूल्य आणि बालक-केंद्रित, मुलांसाठी उपयोगी शिक्षणासाठी राष्ट्रीय तरतूद आहे.
केंद्र व राज्य शासनाने आरटीईची आर्य़िक जबाबदारी सामायिक रुपात सांभाळली पाहिजे. केंद्र सरकारने खर्चाचे अंदाज तयार करावेत. राज्य सरकारे या खर्चातील काही टक्के रक्कम देतील. केंद्र सरकार वित्त आयोगास आरटीईच्या तरतूदींची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारांना अतिरिक्त संसाधने पुरविण्यावर विचार करण्याची विनंती करू शकते.
अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेले बाकीचे निधी पुरविण्यासाठी राज्य सरकार जबाबदार असेल. निधींमध्ये जी तफावत असेल ती भरुन काढण्यासाठी देशातील नागरी समाज, विकास संस्था, कार्पोरेट संस्था आणि नागरिक यांच्यातील भागीदारांनी समर्थन केले पाहिजे.

आरटीई साध्य करण्याचे प्रमुख उद्देश्य काय आहेत?

आरटीई कायदा १ एप्रिलपासून लागू होईल. आदर्श नियम मसुदा राज्यांसह सामायिक केला गेला आहे, जो त्यांच्या राज्यातील नियमांनुसार प्रतिपादित करणे आणि शक्य तितक्या लवकर अधिसूचित करणे आवश्यक आहे.
बाल मजूर, स्थलांतरित मुले, विशेष आवश्यकता असलेली मुले किंवा ‘सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, भौगोलिक, भाषिक, लैगिक किंवा अशा कोणत्याही तत्वामुळे सुविधा विरहित’ असलेली मुले असा सुविधाविरहित गटांसाठी विशिष्ट तरतूदींसह ज्यांचेकडे पोहोचता येत नाही त्यांचेपर्यंत पोहोचण्यासाठी एक मंच आरटीई प्रदान करते. आरटीई अध्ययन व अध्यापनातील गुणवत्तेस महत्त्व देते, ज्यासाठी द्रुतगती प्रयत्न व आवश्यक सुधारणा जरूरी आहेतः

  • १० लाखांहून अधिक नवीन आणि अप्रशिक्षित शिक्षकांना येत्या पाच वर्षात प्रशिक्षित करणे आणि मुलांसाठी उपयुक्त शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी त्यांची सेवेतील शिक्षकाची कौशल्ये वृद्धींगत करण्यासाठी सर्जनशील आणि निरंतर प्रयास करणे महत्त्वाचे आहे.
  • भारतातील अंदाजे १९ कोटी मुली व मुले, ज्यांना प्राथमिक शिक्षण मिळाले पाहिजे, त्यापैकी प्रत्येक मुलासाठी उपयुक्त शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी परिवार आणि समुदायांनीदेखील महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे.
  • निःपक्षपातीपणे गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी विषमता टाळली पाहिजे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी बालवाड्यांमध्ये गुंतवणूक करणे ही एक मुख्य योजना आहे.
  • ८० लाख शाळेबाहेरील मुलांना त्यांच्या योग्य वयात, शाळेत राहण्यासाठी उचित समर्थनासह वर्गापर्यंत आणणे आणि त्यानंतरच्या प्रक्रिया या लवचिक, अद्ययावत् दृष्टिकोणांच्या आवश्यकतेचे आव्हान करीत आहेत.

आरटीईचे उल्लंघन झाल्यास काय केले जाईल?

बाल अधिकार संरक्षणासाठी राष्ट्रीय आयोग या कायद्याअंतर्गत संरक्षण पुरविणार्‍यांचे आवलोकन, तक्रारींची तपासणी करतील आणि त्यांचेकडे दिवाणी कोर्टात दावा करण्याचे अधिकार आहेत.
राज्यांनी १ एप्रिल पासून सहा महिन्यांचे आत बाल अधिकार संरक्षणासाठी राज्य आयोगांची (एससीपीसीआर) किंवा शिक्षणाचा अधिकार संरक्षण प्राधिकरणाची (आरईपीए) स्थापना करावी. तक्रार करू इच्छित असलेल्या कोणत्याही व्यक्तीने स्थानीय अधिकृततेकडे लिखित तक्रार नोंदवली पाहिजे.
विनंत्यांवर एससीपीसीआर/ आरईपीए निर्णय घेतील. फिर्यादी पक्षाच्या दाव्याकरिता योग्य सरकारी स्थापनेमधील प्रमाणित अधिकार्‍यांद्वारे मंजूरी आवश्यक आहे.

आरटीई प्रत्यक्षात आणून वस्तुस्थिती कशी बनेल?

विषमता टाळण्यासाठी आणि निःपक्षपातीपणासह गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी द्रुतगती प्रयत्न आवश्यक आहेत. यूनिसेफ यामध्ये शासन, नागरी समाज, शिक्षक संघटना, प्रसारमाध्यमे आणि सेलिब्रिटी जगतातील संबंधित भागधारकांना एकत्र आणून एक सहाय्यकाची भूमिका बजावेल.
यूनिसेफ जनजागृती वाढविण्यासाठी आणि सक्रियतेसाठी भागीदारांचा वापर करेल. धोरण आणि कार्यक्रम यांची रचना/अंमलबजावणी ही मुलांकरिता सुधारित परिणाम मिळवण्यासाठी काय कार्य करते यावर आधारित गुणवत्तापूर्ण शिक्षणात प्रवेश सुधारण्यावर लक्ष्यित असेल. यूनिसेफ भागीदारांसह आरटीईच्या राष्ट्रीय व राज्य स्तरीय मंडळांना मजबूत बनविण्यासाठीही कार्य करेल.

 स्त्रोत: युनिसेफ


शिक्षणाचा अधिकार सुनिश्चित करण्यासाठी एक रुपरेखा

बाल अधिकार संरक्षण राष्ट्रीय आयोगास (एनसीपीसीआर) मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्याच्या (आरटीई) (RTE) प्रावधानांचे निरीक्षण करणारी एजन्सीत म्हणून नेमण्या‍त आले आहे. आरटीई कायद्याचे कार्यान्वRयन प्रत्यचक्ष व लेखी स्व्रूपात यशस्वीयरीत्याय करण्यात येत आहे ह्याची खात्री करून घेण्यासाठी, एनसीपीसीआरने संस्‍था, सरकारी विभाग, नागरिक समिति आणि इतर भागीदार यांच्यामध्येर सामंजस्यस निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ह्याने (एनसीपीसीआरने) वेगवेगळ्या सरकारी विभागांतून, शिक्षण क्षेत्रांतील प्रतिष्ठित व अनुभवी अधिकारी गणांचा समावेश असलेल्या एका तज्ञ समितिची स्थाढपना केली आहे ज्यातयोगे आरटीईच्याण योग्यल कार्यान्वियनाच्याठ पथदर्शकावर केंद्रीकरण करता येईल.
ह्या नियुक्त मंडळाने (समितिने), ज्याने आतापर्यंत चार बैठकी घेतल्याय आहेत, जास्ते चांगल्या प्रकारे निरीक्षण करण्याच्या सुविधेसाठी एका योजनेची संरचना केली आहे. ह्यामध्ये एनसीपीसीआरमध्येण आरटीईवर विशिष्टय केंद्रीकरण करण्यासाठी एका वेगळ्या विभागाच्याल स्थापनेचा समावेश आहे. ह्या विभागाचे समन्वरयन दोन आयुक्तां च्यावद्वारे करण्याचत येईल आणि ह्याच्याच सर्व गतिविधिंमध्ये् एक वेगळा कर्मचारीगण ह्यांना सहयोग देईल. हा विभाग मानव संसाधन मंत्रालयाशी (मिनस्ट्री ऑफ ह्यूमन रीसोर्सेज् – MHRD) संधान साधेल व त्याधच्या(कडून पाठिंबा देखील प्राप्तय करेल.

तसेच आरटीई कायद्याचे निरीक्षण व यशस्वीद कार्यान्वमयनासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयाशी (एमएचआरडी) परस्प र रूपात्म्कता संवादाची स्थानपना करण्या ची गरज भासेल म्हाणजे ते क्रमबध्द पध्दकतीने काम करू शकतील ह्याची खात्री होईल.
विविध राज्यांमध्येस एनसीपीसीआरचे ‘डोळे व कान’ ह्या स्व‍रूपात कार्य करण्याघसाठी राज्य प्रतिनिधिंची नियुक्ति करणे ही सुचविण्याीत आलेली एक तिसरी रणनीती होती. हे प्रतिनिधि शैक्षणिक क्षेत्रांतील अनुभवीगण तसेच एनसीपीसीआरला त्यांणच्यार संबंधित राज्यांधमध्येष कायद्याच्याय कार्यान्वीयनाच्यात स्थिति बाबत माहिती पुरविणारे नागरिक समितिचे सदस्य असतील. ते आपल्या राज्यांतून प्राप्ता झालेल्या् तक्रारींचा मागोवा घेण्यातसाठी सोयी पुरवितील.

आरटीई कायद्याने प्रभावित असलेल्याह सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय, श्रम मंत्रालय, आदिवासी मुद्दे मंत्रालय आणि पंचायती राज मंत्रालय सारख्या इतर मंत्रालयांच्या अधिकार्‍यांसह परस्पुर समन्व य वाढविण्याआसाठी बैठकी घेण्या त आल्याच. उदाहरणार्थ, बाल श्रम कायद्यावर आरटीई कायद्याचा विशेष प्रभाव आणि बाल श्रम मंत्रालयाची एक विशेष भूमिका आहे. तसेच, जनजाती मुद्दे मंत्रालयाद्वारे संचालित करण्यातत येत असलेल्या. शाळा देखील आरटीईच्या अंतर्गत चालविण्यात येतील. म्हणून, मुलांना आरटीईचा फायदा मिळवून देण्याहसाठी, एनसीपीसीआर आणि ह्या मंत्रालयांचा समन्वय आणि परस्पर संवाद असणे आवश्यरक आहे.
एनसीपीसीआरने राष्ट्री य स्त्री आयोग, अनुसूचित जाति आणि अनुसूचित जमातीच्या राष्ट्रीय आयोगासारख्या इतर राष्ट्रीय आयोगांच्या प्रतिनिधिंच्या भेटी घेतल्या ज्यात त्यांनी आरटीईच्या चांगल्यास निरीक्षणासाठी संयोजनावर चर्चा केली. उदाहरणार्थ, मागासवर्गीय समुदायातील मुली आणि मुलांना शैक्षणिक अधिकारापासून वंचित ठेवण्याभत येऊ नये म्हदणून आयोगांनी कशाप्रकारे एकत्र येऊन काम करावे. असाही सल्ला देण्यात आला की सार्वजनिक एनसीपीसीआरद्वारे आयोजित करण्या त आलेल्या सार्वजनिक सुनावणीत, संबंधित आयोगाच्या एका प्रतिनिधीचा समावेश ज्यूरींमध्ये असावा जेणे करुन प्रभावास बळकटी मिळेल.

देशातील विभिन्न भागात काम करणार्‍या शिक्षण क्षेत्रातील शैक्षणिक नागरिक समाजाच्या प्रतिनिधींशी अधिनियमांच्या प्रावधानांबद्दल आणि त्याच्या निरीक्षणाबद्दल चर्चा करण्यात आली. २० राज्यांतील प्रतिनिधी ह्या सभेत उपस्थित होते. वेगवेगळ्या राज्यांतील प्रतिनिधींसाठी एनसीपीसीआरद्वारे आयोजित करण्यात आलेल्या ह्या श्रृंखलांपैकी नागरिक समाजाच्या संदर्भाची संरचना करण्यासाठीची ही पहिलीच बैठक होती.
तथापि, कायद्याचे कार्यान्वयन आणि त्या च्यार निरीक्षणासाठी, देशांत अधिकाधिक जागरूकतेची आवश्यकता आहे जेणेकरुन त्याची प्रावधाने समजावून घेता येतील आणि सर्व संस्थांच्याद्वारे त्यांचा समावेश करून घेण्यापत येईल. असे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या भाषेत कायद्याचे भाषांतर करुन प्रचार करण्यासाठी प्रचार अभियान आयोजित करायला हवे, बहुदा एमएचआरडी आणि इतर एजंसींचा सहयोग असेलच. एनसीपीसीआरने या कायद्याचा सोपा अनुवाद, पोस्टर आणि पत्रक प्रचारासाठी लागणारे मूलभूत सोयी व अधिकार असणारे साहित्य तयार करून प्रक्रियेचा आरंभ करण्यास सुरुवात केली आहे. ह्यात मुलांसाठीसुध्दाद विशेष साहित्य तयार करण्यात येणार आहे जेणे करुन त्यांना देखील कायद्याची समज येईल.


 स्त्रोत: इन्फोचेंज इंडिया

  शिक्षणाचा अधिकार कायदा २००५
आरटीई नियमांनुसार शाळांतील प्रवेश

देशभरातील शाळांतील प्रवेश हे बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या हक्काचा (आरटीई) अधिनियम, २००९ नुसार केले जावे यासाठी एनसीपीसीआरद्वारा अनेक उपाय योजण्यात आले आहेत. काही राज्यातील काही शाळा शिशुवर्गातील बालकांच्या प्रवेशासाठी कायद्याने प्रतिबंधित अशा चाळणीप्रक्रियेचा अवलंब करत असल्याचे आढळून आल्याने या उपाययोजना हाती घ्याव्या लागल्या. rte_norms.jpgएप्रिलमध्ये, एनसीपीसीआरने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून त्यांनी शाळाप्रवेश आरटीईच्या तरतुदींनुसारच होत आहेत याची खात्री करण्यासाठी सरकारी आदेश जारी करावा असे कळवले होते. शिक्षण संचालक, दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकार, यांनीदेखील, मार्चमध्ये सूचना जारी करुन, संचालनाद्वारा चालवल्या जाणा-या राजकीय प्रतिभा विकास विद्यालयांमधील इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित करून याचा पुनरुच्चार केला.
जीएनसीटीडीच्या शिक्षण संचालकांनी सर्व आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये आणि संचालनालयाच्या वेबसाईटवर प्रवेश सूचना जारी करून विद्यार्थ्यांना रु. २५ भरुन अर्ज विकत घेण्यास आणि त्यानंतर प्रवेशपरीक्षेस बसण्यास आमंत्रित केले होते. यामुळेच एनसीपीसीआरला एप्रिलमध्ये यासंदर्भात हस्तक्षेप करावा लागला. आरटीई कायद्यानुसार शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची चाळणी प्रक्रिया घेण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे आणि शाळांमध्ये प्रवेश यादृच्छिक पद्धतीनेच दिले जाणे आवश्यक आहे; म्हणूनच जीएनसीटीडीची सूचना हे कायद्याचे पूर्णतः उल्लंघन होते .

आरटीई कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था या नात्याने आयोगाने मुख्य सचिव, शिक्षण, जीएनसीटीडी यांना पत्र लिहुन सदर प्रवेश सूचना मागे घेण्यास आणि त्याऐवजी आरटीईच्या तरतुदींशी सुसंगत अशी सूचना जारी करण्यास सांगितले. जीएनसीटीडीमधील सर्व शाळांना कायद्यातील तरतुदींबाबत सरकारी आदेश जारी करण्याची विनंती त्यांनी केली जेणेकरुन त्यांच्या प्रक्रियांमध्ये आणि कार्यप्रद्धतींमध्ये एका आठवड्याच्या आत आवश्यक ते बदल करण्यात येतील.
मात्र संचालनालयाने या विनंतीकडे दुर्लक्ष केले त्यामुळे जूनमध्ये आयोगाद्वारा इशारा देण्यात आला आणि आरटीई तरतुदींनुसार जुलैपर्यंत पुनर्प्रवेशप्रक्रिया घेण्याचा आदेश देण्यात आला. इतर राज्यांमध्येदेखील आरटीईचे अशा त-हेने उल्लंघन होऊ नये यासाठी एनसीपीसीआरने मुख्य सचिवांना पत्र लिहुन कळवले आहे की त्यांच्याद्वारा जारी केल्या जाणा-या सरकारी आदेशामध्ये खालील बाबींचा आवर्जून उल्लेख असावा::

  1. प्रवेशप्रक्रिया आरटीईच्या तरतुदींनुसार व्हाव्यात.
  2. ’निर्देशित श्रेणी’तील आणि खाजगी विनानुदानित सर्व शाळांमध्ये कमकुवत घटकांसाठी २५% आरक्षण असावे आणि सरकारद्वारा अनुदानित शाळांमध्ये आरक्षणाचे नियम पाळले जावेत.

तसेच, सरकारमान्य खाजगी शाळांनादेखील कायद्यातील तरतुदींसंदर्भात आणि आसपासच्या परिसरातील बालकांना शाळेत प्रवेश मिळवता यावा यासंदर्भात सूचना जारी केल्या जाव्यात. तसेच आरटीई कायद्याविषयीच्या राज्यस्तरीय नियमांनादेखील लवकरात लवकर अंतिम स्वरूप दिले जावे.

आरटीई कायद्यामध्ये विशेष श्रेणीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या नवोदय शाळांच्या बाबतीतील प्रश्नांना उत्तर देताना एनसीपीसीआरने स्पष्ट केले की आरटीई कायद्याच्या कलम १३मधील तरतुदी सर्व शाळांना कोणत्याही अपवादाशिवाय लागू आहेत.



कायद्याच्या कलम १३ च्या संबंधित तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत:

कोणत्याही शाळेने किंवा व्यक्तीने बालकाला प्रवेश देताना कोणत्याही स्वरूपाची कॅपिटेशन फी स्वीकारू नये आणि बालक किंवा त्याच्या आई-वडिलांना अथवा पालकांना कोणत्याही चाळणी प्रक्रियेस सामोरे जाण्यास लावू नये

“कोणतीही शाळेने किंवा व्यक्तीने उपकलम (१)च्या तरतुदींविरुद्ध

  1. कॅपिटेशन फी स्वीकारली, तर त्यांना दंड आकारला जाईल जो आकारलेल्या कॅपिटेशन फीच्या दहापटपर्यंत असू शकतो.
  2. बालक किंवा त्याच्या आई-वडिलांना अथवा पालकांना कोणत्याही चाळणी प्रक्रियेस सामोरे जाण्यास लावल्यास त्यांना दंड आकारला जाईल जो पहिल्या वेळी रु. २५,००० आणि त्यानंतरच्या प्रत्येक घटनेसाठी रु. ५०,००० इतका असू शकतो.”

स्त्रोत: एनसीपीसीआर



नवोदय विद्यालयांतील प्रवेशांसाठी चाळणी परीक्षा नाही

राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) नवोदय विद्यालयांच्या आयुक्तांना तसेच राज्य शिक्षणसचिवांना प्राथमिक शिक्षणासाठी (१ ली ते ८ वी) प्रवेश देताना मुलांची कोणत्याही प्रकारे चाळणी प्रक्रिया घेण्याविरोधात पत्र लिहले आहे. दिल्ली आणि इतर राज्यांतील नवोदय विद्यालयांमध्ये मुलांची चाळणी परीक्षा घेण्यात आल्याचे समजल्यावर आरटीईच्या तरतुदींची पायमल्ली थांबविण्यासाठी एनसीपीसीआरने हस्तक्षेप केला आहे.

आरटीई अधिनियम, २००९ च्या कलम १३ चा दाखला देऊन एनसीपीसीआरने याकडे लक्ष वेधले आहे की, बालकाला शाळेत प्रवेश देताना कायद्यानुसार शाळा किंवा व्यक्तींना कॅपिटेशन फी घेण्यास किंवा बालकाला किंवा त्याच्या पालकांना कोणत्याही प्रकारच्या चाळणी प्रक्रियेस सामोरे जाण्यास लावण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. त्यांनी याकडेही लक्ष वेधले आहे की, कोणतीही शाळा किंवा व्यक्ती कॅपिटेशन फी घेताना आढळून आल्यास त्यांना आकारण्यात आलेल्या कॅपिटेशन फीच्या दहापटीपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते.

बालकाला चाळणी प्रक्रियेस सामोरे जाण्यास भाग पाडल्यास प्रथम प्रसंगी रु. २५,००० आणि त्यानंतरच्या प्रत्येक प्रसंगासाठी रु. ५०,००० इतका दंड आकारला जाऊ शकतो.

कलम १३ हे आरटीई अधिनियमामध्ये विशेष श्रेणी शाळांमध्ये नमूद करण्यात आलेल्या नवोदय विद्यालयांसह सर्व शाळांना लागू होते. त्यात असे स्पष्ट करण्यात आलेले आहे की नवोदय विद्यालयांमार्फत घेतल्या जाणा-या चाळणी प्रक्रिया हे आरटीई नियमांचे उल्लंघन आहे. एनसीपीसीआरने राज्य सरकारांनादेखील अधिनियमाच्या तरतुदींबाबत सर्व शाळांना आदेश जारी करण्याची विनंती केली आहे जेणेकरुन त्यांच्या प्रक्रियांमध्ये आणि कार्यप्रद्धतींमध्ये एका आठवड्याच्या आत आवश्यक ते बदल करण्यात येतील.

स्त्रोत: एनसीपीसीआर




Powered by Plone CMS, the Open Source Content Management System

This site conforms to the following standards: